📋 अर्ज प्रक्रिया
⚠️ उमेदवार ८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून अर्ज करू शकतात. ⚠️
मुख्यमंत्री फेलोशिप अर्ज प्रक्रियेमध्ये ४ महत्त्वाचे टप्पे आहेत.
1️⃣ नोंदणी
आपली मूलभूत माहिती भरून नोंदणी करा आणि खाते तयार करा.
2️⃣ प्रोफाइल तयार करणे
आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती पूर्ण करा.
3️⃣ अर्ज फॉर्म
आपली पात्रता तपासा आणि मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करा.
4️⃣ शुल्क भरणे
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज यशस्वीरित्या सादर करण्यासाठी अंतिम शुल्क भरा.
✅ यशस्वी अर्जासाठी चारही टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या सूचना:
१. अर्ज प्रक्रिया सुरळीत आणि अडचणीरहितपणे पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी पीसी किंवा लॅपटॉपचा वापर करावा, असा सल्ला देण्यात येतो.
२. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर शिफारस, दबाव किंवा बाह्य प्रभाव वापरणे अथवा वापरण्याचा प्रयत्न करणे निषिद्ध आहे. असे आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
३. परीक्षा केंद्र केवळ निवडक शहरांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून दिली जातील. पसंतीचे शहर उपलब्ध नसल्यास प्रवेशपत्रावर नमूद केलेले परीक्षा केंद्र स्वीकारणे बंधनकारक राहील. प्रवास व निवासाचा खर्च उमेदवाराने स्वतः करावा.
४. अर्ज शुल्काची रक्कम अंतिम मुदतीपूर्वी संबंधित प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा झाल्याची खात्री करावी. केवळ पेमेंट सुरू करणे म्हणजे अर्ज पूर्ण झालेला मानला जाणार नाही. अयशस्वी, रद्द किंवा विलंबित पेमेंटमुळे अर्ज रद्द होऊ शकतो.
५. कोणत्याही प्रकारचा प्रभाव, शिफारस किंवा बाह्य हस्तक्षेपाद्वारे पोस्टिंग बदलण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
६. विविध प्रशासकीय, क्षेत्रीय व आव्हानात्मक कार्यपरिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवावी.
७. कार्यालयीन जबाबदाऱ्यांसोबत फेलोशिपच्या शैक्षणिक घटकासाठी आवश्यक वेळ व मेहनत देणे अपेक्षित आहे.
८. फेलोशिपदरम्यान देण्यात येणारे अध्ययन व संदर्भ साहित्य नियमितपणे वाचून त्याचा अभ्यास करावा.
९. फेलोशिप ही पूर्णवेळ जबाबदारी म्हणून स्वीकारावी. पूर्वपरवानगीशिवाय इतर कोणतेही शैक्षणिक किंवा व्यावसायिक काम स्वीकारू नये.
१०. दिलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन करत प्रगती अहवाल व इतर कामे निर्धारित मुदतीत सादर करावीत.
११. फेलोशिपदरम्यान प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि नैतिक आचरणाचे उच्च मानदंड पाळावेत.
१२. फेलोशिपचा संपूर्ण कालावधी पूर्ण करण्याची बांधिलकी ठेवावी. योग्य व अपरिहार्य कारणांशिवाय फेलोशिप सोडल्यास दिनांक ८ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयातील अटी लागू होऊ शकतात.
१३. दिनांक ८ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयातील सर्व सूचना, अटी व तरतुदी काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास उमेदवारी रद्द अथवा कार्यक्रमातून वगळले जाऊ शकते.